मा. सदस्य, बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य
श्री. चैतन्य पुरंदरे यांच्याकडे बॅचलर ऑफ कॉमर्स आणि एमबीएची पदवी आहे. 2006 मध्ये पुण्यात संघर्ष सोशल फाऊंडेशनची स्थापना करण्याचे श्रेय त्यांना जाते आणि संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथाश्रम, बालगृहे, संस्थांना आधार मिळाला आहे. त्यांनी निराधार मुलांना साहित्य सहाय्य, समाजातील अनाथ आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवले आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. करोना महामारीच्या काळात, त्यांनी रस्त्यावर भुकेल्या आणि निराधार मुलांच्या कल्याणासाठी योगदान दिले. त्यांनी बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार, शिक्षण हक्क कायदा(RTE), सायबर लॉ इत्यादी विविध विषयांमध्ये व्याख्यानेही दिली आहेत.